best news portal development company in india

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

SHARE:

“मराठेशाहीचा इतिहासकार हरपला”

मुंबई

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालावली. एक दुःखद बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन झाले झाले आहे. आज पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८५ वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. अखेर त्यांची पहाटे प्राणज्योत मालावली. त्यांच्या अकाली निधनाच्या बातमीने “मराठेशाहीचा इतिहासकार हरपला” अशी भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जाण्याने इतिहास संशोधनात एक पोकळी निर्माण झाली आहे. ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, विचारवंत आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांची ख्याती होती. डॉ. जयसिंगराव पवार यांचा जन्म ३० डिसेंबर १९४१ रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर येथे झाला. त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून एम.ए. (सर्वप्रथम) आणि पीएच.डी. पदवी संपादन केली.तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयीन क्षेत्रात प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.

 

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या  जाण्याने महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

निधनाची माहिती

मुंबई येथे पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या निधनानंतर “मराठेशाहीचा इतिहासकार हरपला” अशा भावना विविध स्तरातून व्यक्त होत आहेत.

 शैक्षणिक व व्यावसायिक प्रवास

  • जन्म : ३० डिसेंबर १९४१, तडसर (जि. सांगली)
  • शिक्षण : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून एम.ए. (प्रथम) व पीएच.डी.
  • तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयीन प्राध्यापक म्हणून कार्य

योगदान व ओळख

डॉ. पवार हे केवळ इतिहासकार नव्हते, तर ते एक विचारवंत आणि समाजप्रबोधन करणारे अभ्यासक होते. विशेषतः राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचे ते खंदे पुरस्कर्ते होते. मराठेशाहीचा इतिहास, सामाजिक बदल आणि महाराष्ट्राचा वारसा यावर त्यांनी सखोल संशोधन केले.

 श्रद्धांजली

त्यांच्या निधनामुळे इतिहास अभ्यासक, विद्यार्थी आणि समाजमनाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या कार्याची परंपरा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

आयुष्यातील पहिला रोजा युद्ध बंदीसाठी…

पाच दशकांपासून मोफत काढा वितरण करणारा वाघ परिवार

शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा प्रस्ताव नाही – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Sadhna Thorat
Author: Sadhna Thorat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *