
डासांच्या पोवाड्यापासून साहित्यसम्राटापर्यंत : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास
माटुंगा लेबर कॅम्पमधील डासांच्या त्रासावर पोवाडा लिहिणारा एक संघर्षशील तरुण पुढे मराठी साहित्यविश्वाचा “साहित्यसम्राट” झाला. हा प्रवास केवळ एका लेखकाचा नाही, तर जिद्द, आत्मविश्वास आणि प्रतिभेच्या बळावर इतिहास घडविणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा आहे. अण्णाभाऊ साठे यांनी सिद्ध करून दाखवले की, शिक्षणाची पदवी नसली तरी जीवनाचे ज्ञान, सामाजिक बांधिलकी आणि लोकांप्रती असलेली संवेदना





























