नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई
काही अन्न व्यावसायिक गंजलेले, खराब झालेले, रंग दिलेले किंवा निकृष्ट दर्जाचे सुरी आणि ब्लेड्स वापरत आहेत. अशा उपकरणांमुळे अन्नात अशुद्धता मिसळू शकते आणि ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, धाबे आणि खाद्यपदार्थ निर्मिती करणार्या कारखान्यांमधील अन्नाच्या गुणवत्तेबाबतचे नियम अधिक कडक होणार आहेत. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया ने देशभरातील सर्व अन्न व्यवसायिकांना निर्देश दिले आहेत की, खाद्यपदार्थ कापताना, तयार करताना आणि त्यावर प्रक्रिया करताना केवळ फूड-ग्रेड (अन्नासाठी सुरक्षित) आणि गंज न लागणार्या सुर्या, ब्लेड्स आणि इतर कापण्याच्या साधनांचाच वापर करावा. या नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे की, अन्नाच्या संपर्कात येणारी सर्व उपकरणे ही फूड-ग्रेड , बिनविषारी आणि गंज न लागणार्या साहित्यापासून बनलेली असावीत. अन्न कापण्यासाठी, त्याचे तुकडे करण्यासाठी (स्लाइसिंग), त्यावर प्रक्रिया करण्यासाठी, पॅकेजिंगसाठी आणि ते तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्या सर्व उपकरणांना हे नवीन निर्देश लागू होतात. यामध्ये सुर्या, ब्लेड्स, स्लाइसिंग मशीन्स, कापण्याची साधने आणि अन्न प्रक्रिया करणारी इतर साधने यांचा समावेश आहे. ही उपकरणे स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत ठेवणेही अनिवार्य असल्याचे ने स्पष्ट केले आहे.
गंजलेली किंवा खराब झालेली उपकरणे अन्नात धातूचे कण, रासायनिक घटक आणि जीवाणू (बॅक्टेरिया) मिसळू शकतात. यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा आणि आरोग्याच्या इतर समस्यांचा धोका वाढतो. परिणामी, ने राज्याच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना तपासणीदरम्यान विशेष दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. जर एखादे हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ निर्मितीचा कारखाना किंवा इतर कोणताही अन्न व्यवसाय या नियमांचे उल्लंघन करताना आढळला, तर त्यांच्यावर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अॅक्ट, २००६ (अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६) अंतर्गत कारवाई केली जाईल.







